SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .
Showing posts with label प्रजासत्ताक दिन. Show all posts
Showing posts with label प्रजासत्ताक दिन. Show all posts

Wednesday, January 17, 2024

प्रजासत्ताक दिन निबंध

 प्रजासत्ताक दिन निबंध



१५ ऑगस्ट, १९४७ ह्या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि इंग्रज लोकांची आपल्या देशावरील सत्ता संपली. त्यानंतर आपल्या देशात लोकशाही असावी असे ठरले. त्या लोकशाहीचे सर्व नियम ज्यात लिहिले आहेत अशी एक राज्यघटना तयार करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद इत्यादी लोकांनी खूप कष्ट घेऊन केले. अशा रीतीने २६ जानेवारी, १९५० ह्या दिवशी भारत हा देश एक स्वतंत्र लोकशाही राष्ट्र म्हणून अस्तित्वात आला.

लोकशाही ह्याचा अर्थ लोकांचे, लोकांसाठी, लोकांनी चालवलेले सरकार. लोकशाहीत सर्व नागरिक समान असतात, प्रत्येकाला आपला आपला धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य असते. दर पाच वर्षांनी निवडणुका होतात आणि ज्या पक्षाला सर्वाधिक मते मिळतात त्या पक्षाचा प्रमुख देशाचा पंतप्रधान बनतो.

दर वर्षी २६ जानेवारी हा दिवस आपण भारतीय नागरिक प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. ह्या दिवशी आम्ही मुले शाळेत जातो आणि ध्वजवंदन करतो. आमचा देश हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो.

आम्ही मुले एका स्वतंत्र, लोकशाही देशाचे भावी नागरिक आहोत आणि आमच्या देशाच्या प्रगतीतील वाटा आम्ही उचलू

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

देशभक्तीपर चारोळ्या पाहण्यासाठी खालील बटनाला टच करा


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

प्रजासत्ताक दिन भाषण पाहण्यासाठी खालील बटनाला टच करा.