♻️ सुविचार ♻️
⚜️ मन माणसाला कसे बघावे हे शिकवते.
⚜️ मरणाचे सतत स्मरण असावे.
⚜️ दृढ विश्वास हाच महान कार्याचा जनक आहे.
⚜️ महात्मे आपत्तीत सापडले तरी आपला स्वभाव सोडत नाहीत.
⚜️ महत्वकांक्षेशिवाय माणूस म्हणजे शिडाशिवाय जहाज.
⚜️ हिरा देखील पैलू पडल्याशिवाय चमकत नाही.
⚜️ ज्ञानाने श्रेष्ठत्व व मनाचे कर्तुत्व कोणत्याही वस्तूपेक्षा अधिक असते.
⚜️ सत्य झाकले जाईल पण मावळले कधीच जाणार नाही.
⚜️ देश हा देव असे माझा !
⚜️ माणसाचे मन हे परमेश्वराला जागेपणी पडलेले स्वप्न आहे.
⚜️ शरीर, मन, बुद्धी यांचा विकास म्हणजे शिक्षण.
⚜️ सत्याशिवाय दुसरा मार्ग नाही.
⚜️ पुस्तक प्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असतो.
⚜️ कविता हे सर्व ज्ञान पुष्पाचे अत्तर आहे.
⚜️ आली जरी कष्ट जरी तशा अपार न टाकीती धैर्य तथापि थोर.
⚜️ जीवन म्हणजे मृत्यूशी चाललेला लपंडाव.
⚜️ जो सर्वात कमी चुका करतो तो सर्वात श्रेष्ठ आहे.
⚜️ माणूस स्वतःचा भाग्यविधाता असतो.
⚜️ स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करण्याशिवाय उभे राहत नाही.
⚜️ शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ
⚜️ गरज ही शोधाची जननी आहे.
⚜️ जीवन म्हणजे नवे व जुने संघर्ष.
⚜️ खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.
⚜️ सत्य शिवाय दुसरा धर्म नाही.
⚜️ परिश्रम करायची तयारी असलेली व्यक्ती जीवनात यशस्वी होते.
⚜️ इतिहासाचे आणि अनुभवाचे काढलेले सार म्हणजे ज्ञान.
⚜️ महान त्यागानेच महान कार्य होऊ शकते.
⚜️ मोठेपण वयाने सिद्ध होत नाही ते कर्तुत्वाने सिद्ध होते.
⚜️ जी वाणी सत्याला संभाळते त्या वाणीला सत्य सांभाळते.
⚜️ इच्छेला प्रयत्नांची जोड मिळाली की सफलता मिळणारच.
⚜️ जुन्या पासून बोध घ्या नव्याचा शोध घ्या.
⚜️ अंतकरणाची सुंदरता सुंदर विचारातून प्रकट होते.
⚜️ घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही.
⚜️ आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे.
⚜️ माणसाने माणसावर प्रेम करणे हा जगातील मोठा धर्म आहे.
⚜️ आरोग्य हेच व्यक्तीचे खरेखुरे धन.
⚜️ जीवन ही समर भूमी आहे येथे लहान मोठ्या जखमा होणारच.
⚜️ माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा चांगुलपणा राहतो.
⚜️ बुद्धिमान मुले ही राष्ट्राची अत्यंत महत्त्वाची ठेव आहे.
⚜️ लोकमत लहरी असते.
⚜️ माणसाने जीवनात आपले ध्येय निश्चित करावे.
⚜️ सतत पाण्याची धार पडली की अभेद्य दगडही फुटतात.
⚜️ मनात प्रेम असल्याशिवाय आपण दुसऱ्याचे मन समजू शकत नाही.
⚜️ दुर्बल मनुष्याला कोणत्याही कार्यात यश येणे शक्य नाही.
⚜️ नम्रतेची काया हा सद्गुणाचा पाया.
⚜️ क्षमेचा उपयोग स्वतःपेक्षा इतरांच्या बाबतीत अधिक करावा.
⚜️ त्याग ही प्रेमाची कसोटी.
⚜️ प्रयत्न हाच परमेश्वर.
⚜️ संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव.
⚜️ मनाला नेहमी उद्योगात गुंतवून ठेवा.
⚜️ माणसाचे मन परमेश्वराला जागेपणी पडलेले एक स्वप्न आहे.
⚜️ दुसऱ्याला उपदेश करण्यासारखी सोपी गोष्ट नाही.
⚜️ सामर्थ्याशिवाय अन्यायाचा प्रतिकार करता येत नाही.
⚜️ त्याग हीच प्रेमाची कसोटी.
⚜️ कर्ज हे कितीही उपकारक असले तरी ते ओझेच असते.
⚜️ ज्याला आपल्या अज्ञानाची अखंड जाणीव असते तोच ज्ञानी होय.
⚜️ रात्र गुपचूप पणे कळ्या फुलविते आणि तिचे श्रेय मात्र दिवसाला घेऊ देते.
⚜️ ज्योतिष माणसाला दुर्बल करते, नकारात्मक भूमिका घ्यायला शिकवते.
⚜️ हृदयात अपार सेवा भरली की सगळीकडे मित्र दिसू लागतात.
⚜️ अन्न म्हणजे देव आहे म्हणून त्याचा कधीही अपव्यय करू नये.
⚜️ मित्राच्या मरणापेक्षा मैत्रीचे मरण असह्य असते.
⚜️ अविरत उद्योग हा शांती समाधानाचा झरा होय.
⚜️ आधी जातो मनाचा तोल मग जातो शरीराचा तोल.
⚜️ दैववादी मनुष्य सत्वर नाश पावतो.
⚜️ अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण.
⚜️ चांगुलपणाचा मार्ग काटेरी असला तरी त्याची फळे गोड मिळतात.
⚜️ तुम्हाला कोणी फसवले म्हणून तुम्ही कोणाला फसवू नका.
⚜️ माणसाने निदान स्वतःला तरी नीट समजून घ्यावे.
⚜️ श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत होण्याचा प्रयत्न करा.
⚜️ तुम्हाला जर मित्र हवे असतील तर तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.
⚜️ दोष काढणे सोपे आहे पण सुधारणे अवघड आहे.
⚜️ आपण कसे दिसतो यापेक्षा कसे आहोत याचा विचार करा.
⚜️ समोर अंधार असला तरी त्यापलीकडे प्रकाश आहे.
⚜️ भव्य विचार हा सुगंधासारखा असतो.
⚜️ माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा चांगुलपणा फक्त राहतो.
⚜️ आईसारखे जगात दुसरे पवित्र दैवत नाही.
⚜️ माता ही प्रेमाची सरिता आहे.
⚜️ माता, पिता, गुरु आणि स्वदेश यांची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा.
⚜️ अपयशी यशाची पहिली पायरी आहे.
⚜️ संस्कृतीचा उगम आपल्या घरापासून होतो.
⚜️ पुस्तक म्हणजे मानवी संस्कृतीला उजाळा देणारे दीपस्तंभ आहे.
⚜️ स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आहे.
⚜️ नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीच मिळत नाही.
⚜️ इतिहासाचे आणि अनुभवाचे काढलेले सार म्हणजे ज्ञान.
⚜️ स्वातंत्र्य हे सर्वोच्च जीवनमूल्य आहे.
⚜️ संकटा पेक्षा संशय यशाला फार घातक ठरतो.
⚜️ धर्म म्हणजे आत्मसाक्षात्कार.
⚜️ संघर्ष जेवढा बिकट तेवढे यश अधिक उज्वल.
⚜️ द्वेषाने द्वेषाला कधीच जिंकता येणार नाही.
⚜️ नवीन शिकायची उमेद ज्याची गेली तो म्हातारा.
⚜️ ज्ञानाने बुद्धि जिंकता येते पण सेवेने अंत:करण जिंकता येते.
⚜️ बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.
⚜️ जीवन फुलासारखे असू द्या पण ध्येय मधमाशी सारखे असू द्या.
⚜️ चिकाटी ही जीवनातील यशाचे साधन होय.
⚜️ जो स्पष्ट वक्ता असतो तो कधीच कपटी नसतो.
⚜️ चंदनाप्रमाणे झिजल्याशिवाय कीर्ती सुगंध दरवळत नाही.
⚜️ आयुष्यातील बिकट प्रसंगांना तोंड देण्याची तालीम म्हणजे खेळ.
⚜️ आपल्या कार्यात एकाग्र होणे ही यशाची पहिली पायरी आहे.
⚜️ वाचन हे मनाचे अन्न.
⚜️ माझे तेच खरे म्हणू नका, खरे तेच माझे म्हणा.
⚜️ मोठेपणा हा शिलतेवरून ठरतो.
⚜️ निर्मलांना रक्षण देणे हीच खरी बलाची सफलता होय.