SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Thursday, September 29, 2022

सुविचार

♻️ सुविचार ♻️



⚜️ मन माणसाला कसे बघावे हे शिकवते.

⚜️ मरणाचे सतत स्मरण असावे.

⚜️ दृढ विश्वास हाच महान कार्याचा जनक आहे.

⚜️ महात्मे आपत्तीत सापडले तरी आपला स्वभाव सोडत नाहीत.

⚜️ महत्वकांक्षेशिवाय माणूस म्हणजे शिडाशिवाय जहाज.

⚜️ हिरा देखील पैलू पडल्याशिवाय चमकत नाही.

⚜️ ज्ञानाने श्रेष्ठत्व व मनाचे कर्तुत्व कोणत्याही वस्तूपेक्षा अधिक असते.

⚜️ सत्य झाकले जाईल पण मावळले कधीच जाणार नाही.

⚜️ देश हा देव असे माझा !

⚜️ माणसाचे मन हे परमेश्वराला जागेपणी पडलेले स्वप्न आहे.

⚜️ शरीर, मन, बुद्धी यांचा विकास म्हणजे शिक्षण.

⚜️ सत्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

⚜️ पुस्तक प्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असतो.

⚜️ कविता हे सर्व ज्ञान पुष्पाचे अत्तर आहे.

⚜️ आली जरी कष्ट जरी तशा अपार न टाकीती धैर्य तथापि थोर.

⚜️ जीवन म्हणजे मृत्यूशी चाललेला लपंडाव.

⚜️ जो सर्वात कमी चुका करतो तो सर्वात श्रेष्ठ आहे.

⚜️ माणूस स्वतःचा भाग्यविधाता असतो.

⚜️ स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करण्याशिवाय उभे राहत नाही.

⚜️ शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ

⚜️ गरज ही शोधाची जननी आहे.

⚜️ जीवन म्हणजे नवे व जुने संघर्ष.

⚜️ खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.

⚜️ सत्य शिवाय दुसरा धर्म नाही.

⚜️ परिश्रम करायची तयारी असलेली व्यक्ती जीवनात यशस्वी होते.

⚜️ इतिहासाचे आणि अनुभवाचे काढलेले सार म्हणजे ज्ञान.

⚜️ महान त्यागानेच महान कार्य होऊ शकते.

⚜️ मोठेपण वयाने सिद्ध होत नाही ते कर्तुत्वाने सिद्ध होते.

⚜️ जी वाणी सत्याला संभाळते त्या वाणीला सत्य सांभाळते.

⚜️ इच्छेला प्रयत्नांची जोड मिळाली की सफलता मिळणारच.

⚜️ जुन्या पासून बोध घ्या नव्याचा शोध घ्या.

⚜️ अंतकरणाची सुंदरता सुंदर विचारातून प्रकट होते.

⚜️ घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही.

⚜️ आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे.

⚜️ माणसाने माणसावर प्रेम करणे हा जगातील मोठा धर्म आहे.

⚜️ आरोग्य हेच व्यक्तीचे खरेखुरे धन.

⚜️ जीवन ही समर भूमी आहे येथे लहान मोठ्या जखमा होणारच.

⚜️ माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा चांगुलपणा राहतो.

⚜️ बुद्धिमान मुले ही राष्ट्राची अत्यंत महत्त्वाची ठेव आहे.

⚜️ लोकमत लहरी असते.

⚜️ माणसाने जीवनात आपले ध्येय निश्चित करावे.

⚜️ सतत पाण्याची धार पडली की अभेद्य दगडही फुटतात.

⚜️ मनात प्रेम असल्याशिवाय आपण दुसऱ्याचे मन समजू शकत नाही.

⚜️ दुर्बल मनुष्याला कोणत्याही कार्यात यश येणे शक्य नाही.

⚜️ नम्रतेची काया हा सद्गुणाचा पाया.

⚜️ क्षमेचा उपयोग स्वतःपेक्षा इतरांच्या बाबतीत अधिक करावा.

⚜️ त्याग ही प्रेमाची कसोटी.

⚜️ प्रयत्न हाच परमेश्वर.

⚜️ संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव.

⚜️ मनाला नेहमी उद्योगात गुंतवून ठेवा.

⚜️ माणसाचे मन परमेश्वराला जागेपणी पडलेले एक स्वप्न आहे.

⚜️ दुसऱ्याला उपदेश करण्यासारखी सोपी गोष्ट नाही.

⚜️ सामर्थ्याशिवाय अन्यायाचा प्रतिकार करता येत नाही.

⚜️ त्याग हीच प्रेमाची कसोटी.

⚜️ कर्ज हे कितीही उपकारक असले तरी ते ओझेच असते.

⚜️ ज्याला आपल्या अज्ञानाची अखंड जाणीव असते तोच ज्ञानी होय.

⚜️ रात्र गुपचूप पणे कळ्या फुलविते आणि तिचे श्रेय मात्र दिवसाला घेऊ देते.

⚜️ ज्योतिष माणसाला दुर्बल करते, नकारात्मक भूमिका घ्यायला शिकवते.

⚜️ हृदयात अपार सेवा भरली की सगळीकडे मित्र दिसू लागतात.

⚜️ अन्न म्हणजे देव आहे म्हणून त्याचा कधीही अपव्यय करू नये.

⚜️ मित्राच्या मरणापेक्षा मैत्रीचे मरण असह्य असते.

⚜️ अविरत उद्योग हा शांती समाधानाचा झरा होय.

⚜️ आधी जातो मनाचा तोल मग जातो शरीराचा तोल.

⚜️ दैववादी मनुष्य सत्वर नाश पावतो.

⚜️ अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण.

⚜️ चांगुलपणाचा मार्ग काटेरी असला तरी त्याची फळे गोड मिळतात.

⚜️ तुम्हाला कोणी फसवले म्हणून तुम्ही कोणाला फसवू नका.

⚜️ माणसाने निदान स्वतःला तरी नीट समजून घ्यावे.

⚜️ श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत होण्याचा प्रयत्न करा.

⚜️ तुम्हाला जर मित्र हवे असतील तर तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.

⚜️ दोष काढणे सोपे आहे पण सुधारणे अवघड आहे.

⚜️ आपण कसे दिसतो यापेक्षा कसे आहोत याचा विचार करा.

⚜️ समोर अंधार असला तरी त्यापलीकडे प्रकाश आहे.

⚜️ भव्य विचार हा सुगंधासारखा असतो.

⚜️ माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा चांगुलपणा फक्त राहतो.

⚜️ आईसारखे जगात दुसरे पवित्र दैवत नाही.

⚜️ माता ही प्रेमाची सरिता आहे.

⚜️ माता, पिता, गुरु आणि स्वदेश यांची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा.

⚜️ अपयशी यशाची पहिली पायरी आहे.

⚜️ संस्कृतीचा उगम आपल्या घरापासून होतो.

⚜️ पुस्तक म्हणजे मानवी संस्कृतीला उजाळा देणारे दीपस्तंभ आहे.

⚜️ स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आहे.

⚜️ नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीच मिळत नाही.

⚜️ इतिहासाचे आणि अनुभवाचे काढलेले सार म्हणजे ज्ञान.

⚜️ स्वातंत्र्य हे सर्वोच्च जीवनमूल्य आहे.

⚜️ संकटा पेक्षा संशय यशाला फार घातक ठरतो.

⚜️ धर्म म्हणजे आत्मसाक्षात्कार.

⚜️ संघर्ष जेवढा बिकट तेवढे यश अधिक उज्वल.

⚜️ द्वेषाने द्वेषाला कधीच जिंकता येणार नाही.

⚜️ नवीन शिकायची उमेद ज्याची गेली तो म्हातारा.

⚜️ ज्ञानाने बुद्धि जिंकता येते पण सेवेने अंत:करण जिंकता येते.

⚜️ बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.

⚜️ जीवन फुलासारखे असू द्या पण ध्येय मधमाशी सारखे असू द्या.

⚜️ चिकाटी ही जीवनातील यशाचे साधन होय.

⚜️ जो स्पष्ट वक्ता असतो तो कधीच कपटी नसतो.

⚜️ चंदनाप्रमाणे झिजल्याशिवाय कीर्ती सुगंध दरवळत नाही.

⚜️ आयुष्यातील बिकट प्रसंगांना तोंड देण्याची तालीम म्हणजे खेळ.

⚜️ आपल्या कार्यात एकाग्र होणे ही यशाची पहिली पायरी आहे.

⚜️ वाचन हे मनाचे अन्न.

⚜️ माझे तेच खरे म्हणू नका, खरे तेच माझे म्हणा.

⚜️ मोठेपणा हा शिलतेवरून ठरतो.

⚜️ निर्मलांना रक्षण देणे हीच खरी बलाची सफलता होय.


No comments:

Post a Comment