SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Wednesday, August 31, 2022

दादाभाई नौरोजी

⚜️ दादाभाई नौरोजी ⚜️



दादाभाई नौरोजी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 रोजी मुंबई येथे एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील नौरोजी पालनजी दोर्दी व आई माणिकाबाई या होत्या. वडील पारशी समाजाचे पौरोहित्य करून आपला प्रपंच चालवीत होते.

दादाभाई चार वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या आईने पालन पोषण केले. दादाभाईंचे प्राथमिक शिक्षण सुरू असताना आईने त्यांचे लग्न सोराबजी श्रॉफ यांची सात वर्षाची मुलगी गुलाबी हिच्यासोबत लावून दिले.

ते लहानपणापासून अत्यंत हुशार होते अत्यंत एकाग्रतेने ते अभ्यास करत असत. त्यामुळे त्यांच्या जाणीव लहानपणापासूनच प्रकल्प होत. गेल्या 845 मध्ये त्यांनी मुंबईच्या एलफिस्टंट कॉलेजमधून पदवी संपादन केली. त्यानंतर त्याच कॉलेजमध्ये गणित व तत्त्वज्ञान या विषयांचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले. अध्ययन व अध्यापन यामुळे त्यांना समाजाची ओळख होऊ लागली आणि त्यांनी आपल्या सार्वजनिक कामास सुरुवात केली. त्यांनी मराठी व पारशी मुलांसाठी काही शाळा काढल्या. तसेच त्यांनी 1851 मध्ये रास्त गोफ्तार (खरी बातमी) हे गुजराती साप्ताहिक काढले.

1855 मध्ये त्यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडली. आणि ते कामा आणि कंपनीचे व्यवस्थापक म्हणून लंडनला गेले. तेथे त्यांनी अनेक भारतीय संस्थांची संबंध ठेवला. आणि भारतीयांची मने जिंकून घेतली. लंडनमध्ये काम करताना त्यांनी तेथील वृत्तपत्रात लेख लिहून भारताबद्दल असलेले गैरसमज दूर केले. लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजात गुजराती भाषा शिकवण्याचे प्राध्यापक म्हणून काम केले. 1865 साली इंग्लंडमध्ये वास्तव्य करणाऱ्या व्ही. सी. बॅनर्जी यांच्या साह्याने त्यांनी "लंडन इंडिया सोसायटी" ही संस्था सुरू केली. हळूहळू संस्थेचे कार्य वाढू लागले.

1869 मध्ये दादाभाई भारतात परत आले त्यावेळी त्यांच्या कार्याबद्दल त्यांना मानपत्र देण्यात आले 1873 साली त्यांनी "प्रॉव्हर्टी इन् इंडिया" हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक "कंडिशन ऑफ इंडिया" या नावाने प्रसिद्ध झालेल्या वास्तवात त्यांनी भारतातील परंपरागत रुढीत गुंतलेला समाज पाहिला.

मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड रे हे होते. त्यांच्या कौन्सिलमध्ये काम करत असताना ते पुन्हा इंग्लंडला गेले. 1892 मध्ये ते इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये निवडून आले. पार्लमेंटमध्ये निवडून येणारे ते पहिले भारतीय होते. त्यांनी भारतीय लोकांना जो त्रास होतो, त्याचा विचार पार्लमेंटमध्ये निर्भीडपणे मांडला. इंग्लंड सरकारच्या मालाच्या रूपाने भारतातील पैसा इकडे कसे आणले जातात, याचे प्रतिपादन केले. "भारतीयांची गरिबी आणि ब्रिटिशांचे जुलमी राज्य" या ग्रंथात त्यांनी साधार विचार व्यक्त केले.

सामाजिक विषमता त्यांच्या अंतरंगाला मानवत नव्हती. स्त्री व पुरुषांना समान महत्त्व दिले पाहिजे, असे ते म्हणत. स्त्रियांनी शिक्षण घेतलेच पाहिजे, ही त्यांची इच्छा होती. विधवा विवाह हा अवश्य व्हावा असे त्यांचे स्पष्ट मत होते.

1885 मध्ये सर ऍलन ह्युम यांनी मुंबईत इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली. यावेळी दादाभाई तेथे हजर होते. ते काँग्रेसचे सभासद बनले. आपले स्वराज्याचे विचार ते सातत्याने समाजासमोर मांडत असत. इंग्रजांच्या राजकारणातील दोष दाखवीत त्यांनी सामाजिक जागृती केली. 1886 कलकत्ता, 1893 लाहोर व 1906 साली कलकत्त्याच्या काँग्रेस अधिवेशनात ते अध्यक्ष होते.

कलकत्ता अधिवेशनात लोकमान्य टिळकांची भेट झाली. भारत स्वतंत्र झाल्याशिवाय आम्हाला प्रगती करता येणार नाही असे ते आपल्या सभेत जाहीर करत असत. लक्षावधी लोकांना त्यांनी आपल्या विचारांनी भारून टाकले. परदेशी मालावर बहिष्कार घाला व देशी मालाचा स्वीकार करा हे शिकवले. आम्हाला संपूर्ण "स्वराज्य" पाहिजे असे ते इंग्रजांना स्पष्टपणे सांगत असत.

भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्य चळवळीचे पितामह असे गौरविण्यात आले. वयाच्या 92 व्या वर्षी 30 जून 1917 रोजी मुंबईत त्यांची प्राणज्योत मावळली.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

दादाभाई नौरोजी यांच्या जीवनावरील काही महत्त्वाचे मुद्दे~

🔖 दादाभाई नवरोजी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 ला गुजरात मधील नौसारी या गावी पारशी कुटुंबात झाला.

🔖 एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये मुंबई येथे ते गणित या विषयाचे पहिले प्राध्यापक होते.

🔖 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता.

🔖 1861 साली त्यांनी "रास्त गोफ्तार" या साप्ताहिकाची सुरुवात केली.

🔖 1873 मध्ये ड्रेन थेअरी (लुटीचा सिद्धांत) मांडला.

🔖 1874 मध्ये बडोदा संस्थानाचे दिवाण बनले.

🔖 1875 मध्ये मुंबई महापालिकेचे सदस्य.

🔖 1885 मध्ये राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत सहभाग होता.

🔖 1885 मध्ये मुंबई प्रांतिक कायदे मंडळाचे सदस्य.

🔖 भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे त्यांना म्हटले जाते.

🔖 क्विन्समेरी मतदारसंघातुन निवडुन येऊन हाऊस ऑफ कॉमन्सचे पहिले हिंदी सभासद 1892 ला बनले.

🔖 1887 मध्ये इंडियन रिफॉर्म असोसिएशनची स्थापना केली.

🔖 "पावर्टी अँड अनब्रिटिश रुल इन इंडिया" हा ग्रंथ लिहिल

🔖 इंग्रजांनी त्यांना "जस्टीस ऑफ पीस" हा किताब दिला

🔖 विल्बी कमिशन समोर साक्ष दे देणारे पहिले भारतीय होय.

🔖 त्यांना आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते, पितामह, ग्रँड-ओल्ड-मॅन ऑफ इंडिया म्हटले जाते.

🔖 त्यांचे निधन 30 जून 1917 मध्ये मुंबई येथे झाले.














Tuesday, August 30, 2022

गणपती उत्सव

 गणपती उत्सव

दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी पासून गणपती उत्सव सुरू होतो. सारे हिंदू ह्या दिवशी गणेशाची पूजा करतात.

स्वतंत्र्यापूर्वी हा सण घरगुती स्वरूपात साजरा होत. असे परंतु लोकमान्य टिळकांनी ओळखले की लोकांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने जर आपण ह्या सणाचे रूपांतर सार्वजनिक उत्सवात केली तर खूप चांगले होईल. तो काळ पारतंत्र्याचा होता सणाच्या निमित्ताने लोकजागृतीचे काम करता येईल असा हेतू त्यामागे होता.

सुरुवातीच्या काळात तो हेतू साध्य ही होत होता. कारण स्वतः लोकमान्य टिळक, केळकर गोखले, आणि रानडे यांसारखे वक्ते उत्सवाच्या वेळेस भाषणे करत असत. हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा यांसारख्या गायिका तिथे येऊन मैफिली गात असत.

नंतर पुढे स्थानिक कलाकार नाटके, नृत्य बसू लागली. वेगवेगळ्या स्पर्धा होऊन स्थानिक मुलामुलींच्या कलागुणांना उत्तेजन मिळू लागले. लोकांनी सांस्कृतिक भूक भागू लागली. एकोपाही वाढू लागला. 

आता मात्र ह्या उत्सवाला विकृत रूप मिळू लागले आहे. गणपतीच्या प्रचंड मूर्ती, अश्लील गाण्यांचा दणदणात, प्रदूषण, रस्ते अडवून घातलेले मंडप ह्या सगळ्या गोष्टींवर बंदी घालून हा उत्सव चांगल्या स्वरूपात सादर झाला पाहिजे.

माझे वर्गशिक्षक

 माझे वर्गशिक्षक

माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव संदीप गुळवे. ते खूप चांगले आहेत. मी याच वर्षी या शाळेत प्रवेश घेतला. त्यामुळे नवी शाळा कशी असेल याचे दडपण माझ्या मनावर आले होते. परंतु गुळवे सरांचा हसरा चेहरा पहिल्या दिवशी पाहिला आणि मनावरचे सगळे दडपण निघून गेले.

 गुळवे सर खूप प्रेमळ आहेत. ते सर्व विषय समरस होऊन शिकवतात. आम्हाला गृहपाठ खूप जास्त देत नाहीत.

त्यांचे वर्गातील सर्व मुलांकडे चांगले लक्ष असते. कोणी जास्त दिवस शाळेत आले नाही तर त्यांना काळजी वाटते. आम्हाला ते अभ्यासक्रमाबाहेरच्या कविता आणि गोष्टीही सांगतात. जी मुले गुण कमी मिळवतात त्यांच्याकडे ते जास्त लक्ष देतात. त्या मुलांना काय कळत नाही ते समजून घेतात आणि त्यांना ती पुन्हा पुन्हा समजून देतात.

शिस्त पाळावी, अक्षर चांगले काढावे, स्वच्छता पाळावी ह्या गोष्टी ते आम्हाला शिकवतात. माझ्या चांगल्या अक्षराचे गुरुजींना खूप कौतुक वाटते. मला त्यांनी वर्गाचे मॉनिटर केले आहे.

गुरुजींचा मला फार आधार वाटतो. शाळा सोडल्यावर ही मी गुरुजींना कधीच विसरणार नाही.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Saturday, August 27, 2022

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन




डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी आंध्र प्रदेशातील तीरुत्तली या छोट्याशा गावामध्ये झाला. त्यांचे कुटुंब मध्यमवर्गीय होते. त्यांचे बालपण तीरुत्तली व तिरुपती या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी गेले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येथील मिशनरी शाळेमध्ये झाले. शालेय शिक्षण घेत असताना त्यांच्या असे लक्षात आले की मिशनरी शाळेमध्ये हिंदू धर्माची निंदा केली जाते. हिंदू धर्मामध्ये अस्पृश्यता, जातीयता, अंधश्रद्धा असे अनेक दोष आहेत. ते प्रारंभी दूर केले पाहिजेत. यासाठी वेद, उपनिषदे व गीता अशा विविध ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे. अशी राधाकृष्णन यांची ठाम धारणा बनली आणि त्यांनी अभ्यासास सुरुवातही केली.

मद्रास येथील मिशनरी कॉलेजमध्ये 1905 साली तत्त्वज्ञान विषय घेऊन ते बी.ए. झाले. 1908 साली ते एम.ए. झाले. त्यांनी वेदांतील नीतीशास्त्र विषयावर निबंध लिहिला. प्रेसिडेन्सी विद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करू लागले. वास्तविक पाहता तत्त्वज्ञान अवघड विषय परंतु तो विद्यार्थ्यांना समजावा म्हणून अत्यंत सोप्या भाषेत ते शिकवत होते. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली. हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे यासंबंधी त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले. पाश्चात्यांनीसुद्धा त्यांच्या विचारांचा गौरव केला. आणि त्यांना ती आधुनिक ऋषी म्हणू लागले.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन १९२६ साली इंग्लंडमध्ये आयोजित केलेल्या जागतिक तत्त्वज्ञान परिषदेला कलकत्ता विद्यापीठातर्फे गेले होते. तेथे त्यांनी आपल्या अमोघवाणीने हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान साऱ्या जगाला समजावून सांगितले.

ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना तीन वर्षासाठी प्राध्यापक म्हणून बोलावले. तेथे त्यांनी हिंदू जीवन पद्धतीचा दृष्टिकोन (हिंदू व्ह्यू ऑफ लाइफ) या विषयावर विविध ठिकाणी व्याख्याने दिली. ही व्याख्याने अतिशय गाजली. अनेक वृत्तपत्रांनी यांचा गौरव केला. त्यामुळे इंग्लंडमध्ये अनेक ठिकाणी त्यांना व्याख्यानाची निमंत्रणे आली. भारतीय तत्त्वज्ञानातील उदात्त विचार तेथील लोकांना अतिशय आवडले .डॉक्टर राधाकृष्णन यांचे इंग्रजीवर प्रभुत्व होते .ते शांत चित्ताने आपला विषय श्रोत्यांना समजावून सांगत. 1936 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने स्पाल्डिग प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक केली.

1931 साली ते आंध्र विद्यापीठाचे उपकुलगुरू झाले. आंध्र विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डॉक्टररेट पदवी दिली. नंतर ते बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे उपकुलगुरू झाले. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांची जगात ख्याती झाली.

15 ऑगस्ट 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर 1952 साली भारताचे पहिले 'उपराष्ट्रपती' म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली. 1957 मध्ये पुन्हा एकदा उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. भारतरत्न ही पदवी 1958 मध्ये दिली. 1962 साली भारताचे दुसरे 'राष्ट्रपती' म्हणून त्यांची निवड झाली. राष्ट्र संघामध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी काही वर्ष काम केले. ते काही काळ रशियाचे राजदूत होते.

सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार संपूर्ण जगात केला. हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान व प्रचलित हिंदू धर्मात असणारे दोष स्पष्ट केले. तत्त्वज्ञान विषय शिकविताना अत्यंत सोप्या भाषेचा उपयोग केला. विद्यार्थी प्रिय आणि आदर्श शिक्षक असलेल्या सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिन "शिक्षक दिन" म्हणून साजरा केला जातो. या महान पुरुषाचा मृत्यू 17 एप्रिल 1975 साली झाला.


🌷डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन महत्त्वाचे मुद्दे🌷

🔖 जन्म 5 सप्टेंबर 1888 ला तीरुत्तनी दक्षिण भारतात तमिळनाडू येथे.

🔖 पूर्ण नाव ~ राधाकृष्णन विरस्वामी सर्वपल्ली

🔖 त्यांचे पूर्वज सर्वपल्ली या गावात राहत असत यावरून सर्वपल्ली हे नावासोबत जोडले गेले.

🔖 1896 ते 1900 पर्यंत तिरुपती येथे विद्यार्जन केले.

🔖 1900 ते 1904 पर्यंत वेल्लोर येथे शिक्षण घेतले.

🔖 1909 ला तत्त्वज्ञानात एम.ए. केले.

🔖 1909 ला मद्रास येथील कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक या पदी नियुक्त झाले.

🔖 1921 ला कलकत्ता विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक या पदी नियुक्ती. त्यांनी हिंदू धर्म, तत्त्वज्ञान, वेद ,उपनिषदे इत्यादी हिंदू शास्त्राचा गहण अभ्यास केला होता.

🔖 आंध्र प्रदेश विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून 1931 ते 1936 कार्य केले.

🔖 1936 ला ऑक्सफर्ड विद्यापीठ इंग्लंड येथे प्राध्यापक पदी नियुक्ती.

🔖 बनारस हिंदू विद्यापीठाचे 1939 ते 1948 या दरम्यान कुलगुरूपदी कार्य केले.

🔖 घटना समितीचे सदस्य होते.

🔖 1949 ते 1952 भारताचे रशियामध्ये राजदूत.

🔖 1952 ते 1962 भारताचे उपराष्ट्रपती.

🔖 1962 ते 1967 भारताचे राष्ट्रपती.

🔖 त्यांचा जन्मदिन 5 सप्टेंबर " शिक्षक दिन " म्हणून साजरा करतात.

🔖 " भारतरत्न " हा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना 1954 मध्ये प्रदान केला.

🔖 लेखन दि हिंदू व्ह्यू ऑफ लाइफ, फिलॉसॉपी ऑफ दि उपनिषदज, इंडियन फिलॉसॉफी, अ सोर्स बुक इन इंडियन फिलॉसॉफी, द फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर, स्पिरिट ऑफ रिलीजन, सर्च ऑफ ट्रुथ, इ.

🔖 निधन 17 एप्रिल 1975 ला (मद्रास) चेन्नई येथे झाले.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷




मदर तेरेसा

 मदर तेरेसा


 मदर तेरेसा यांचे मूळ नाव Anjezë Gonxhe Bojaxhiu  हे होते. त्यांचा जन्म 26 ऑगस्ट इ.स. 1910 अल्बानिया येथे झाला. त्यांच्या घरी गरीबी होती. बालपणी त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले. आईने कष्ट करून मुलीला मोठे केले. धर्मासंबंधीची काही पुस्तके त्यांनी वाचली. त्यामुळे सहाजिकच अंतकरणांमध्ये धर्माबद्दल आवड निर्माण झाली.

1958 साली त्यांनी चर्चमध्ये जोगिणीची दीक्षा घेतली. आणि त्या ' मिशनरी ' बनल्या. त्यामुळे त्यांचे नाव मदर तेरेसा झाले. वयाच्या 18 व्या वर्षीच त्यांनी जगातील दुःख पाहिले. आपल्यासारखे अनेक लोक दुःखी आहेत. हे त्यांनी ओळखले. आता आपण 'दुःखितांचे अश्रू पुसायचे' असा निर्धार करून त्या भारतात आल्या.

कलकत्त्यामध्ये त्यांनी धर्मप्रचारिकेचे काम सुरू केले. काही दिवस शिक्षिका म्हणूनही कार्य केले. पण तेथेच त्यांचे मन रमेना. कलकत्त्यामध्ये कालीमातेच्या मंदिराजवळ एक पडकी धर्मशाळा होती. तेथे एक गरीब रुग्ण राहत होता. त्या रुग्णाची कोणी सेवा करणारे नव्हते. मदर तेरेसा पुढे आल्या, आणि त्या रुग्णाची सेवा करण्यास सुरुवात केली. काही लोकांनी या कार्याला विरोध केला. मदर तेरेसांनी सांगितले की रुग्णाची सेवा करणे हा माझा प्रामाणिक हेतू आहे. यांची सेवा करणारे कोणी नाही म्हणून मी सेवा करते. हा विचार लोकांना पटला आणि त्यांनी विरोध थांबवला.

काही काळ त्या कलकत्त्याच्या सेंट मेरी विद्यालयात शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्या काळात त्यांनी कलकत्ता येथे अनेक निराधार लोक दिसून आले. रोगी लोकांना कोणी वाली नाही, याची जाणीव झाली. ही अवस्था पाहून त्यांच्या हृदयातील  करुणाभाव जागृत होत होता.

मदर तेरेसा पाटण्याला आल्या आणि तेथे त्यांनी परिचारिकेचे शिक्षण घेतले. त्यामुळे गोरगरिबांची रुग्णांची सेवा कशा प्रकारे करावी याचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळाले. 1948 साली त्यांना भारताचे नागरिकत्व मिळाले. त्यामुळे भारतातच राहून आपले सेवा कार्य करायचे असे त्यांनी निश्चित केले.

पुन्हा कलकत्त्याला येऊन 'मिशनरीज ऑफ चँरिटी' नावाची सेवाभावी संस्था सुरू केली. मदर तेरेसांनी आपली संपूर्ण जीवन सेवा कार्यासाठी वाहून घेतले होते. कलकत्त्यात त्यांचे कार्य वाढू लागले. कोणत्याही प्रकारचा रुग्ण असला तरी त्या सेवा कार्य करत होत्या. त्यांच्या मनात कोणत्याच प्रकारचा भेदभाव नव्हता व कसली भीतीही नव्हती. जीवावर उदार होऊन त्या कार्य करत होत्या. त्यांच्या कार्याचा कीर्तीसुगंध संपूर्ण देशभर पसरला.

त्यांच्या कार्याचा व्याप वाढू लागला. अनेक मंडळी या सेवाकार्यात सामील झाल्या. त्यांना आर्थिक मदत मिळू लागली. त्यांनी वृद्धांसाठी " निर्मळ हृदय " कुष्ठरोग्यांसाठी " शांतीनगर" अनाथ बालकांसाठी  " निर्मला शिशु भवन " अशा अनेक संस्था काढल्या व मोठ्या उत्साहाने अनेकजण यामध्ये सामील होऊन सेवा करू लागले. अशा संस्थेचे देशात जाळे निर्माण झाले. लोकांनी उदारहस्ते त्यांना मदत केली.

मदर तेरेसांची कीर्ती जगात प्रसिद्ध पावली. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार लाभले. 'पंडित नेहरू पुरस्कार, मॅगसेस पुरस्कार, टेंम्पल्टी पुरस्कार असे पुरस्कार मिळाले. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. 1979 मध्ये त्यांना जागतिक शांततेचा " नोबल पुरस्कार " मिळाला. भारताचे नाव उज्वल केल्यामुळे त्यांना " भारतरत्न " हा भारताचा सर्वोच्च पुरस्कार 1980 साली प्रदान करण्यात आला. त्यांना मिळालेले सर्व पैसे त्यांनी गोरगरिबांसाठी खर्च केले. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता शुद्ध मनाने गरिबांची रुग्णांची सेवा करत राहिल्या. त्यांचा मृत्यू 5 सप्टेंबर 1997 रोजी कोलकाता येथे झाला..

Wednesday, August 24, 2022

शिवराम हरी राजगुरू

 शिवराम हरी राजगुरू

शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म 24 ऑगस्ट 1960 साली पुणे जिल्ह्यातील खेड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे खेड येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ते अमरावतीस गेले. तेथे त्यांच्या माध्यमिक शिक्षणाला सुरुवात झाली.

राजगुरू यांना बालपणापासून व्यायामाची गोडी लागली. ते आवडीने व्यायाम करू लागले. कोणतेही कार्य करावयाचे असेल तर शरीर बलशाली पाहिजे याची त्यांना माहिती झाली. व्यायाम शाळेत अनेक मुले व्यायाम करत होती. व्यायाम झाला की मुलांच्या गप्पागोष्टी होत होत्या. मुले देश प्रेमा संबंधी बोलत असत ते ऐकून राजगुरू यांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत झाली.

वयाच्या पंधराव्या वर्षी ते बनारसला आले. आणि तेथे राहून संस्कृतीचे अध्ययन करू लागले. बनारसला अनेक प्रांतातून मुले येत होती व संस्कृतीचे अध्ययन करत होती. राजगुरू यांचा स्वभाव ज्ञान संपादन करण्याचा होता. त्यामुळे मुलांकडून त्यांनी इंग्रजी, हिंदी, उर्दू ,मल्याळम ,कन्नड, गुजराती इत्यादी भाषा शिकून घेतल्या.

छत्रपती शिवरायांचे चरित्र त्यांच्या हाती पडले आणि ती स्फूर्ती ज्योत अधिकच प्रज्वलित झाली. शिवाजी महाराजांची युद्धातील कौशल्य त्यांनी अभ्यासले ते शिवाजी महाराजांना आपले दैवत मानत असत. बनारस येथे असताना ते काही काळ सेवादलात ही जात होते. सेवा दलातून त्यांना विविध गोष्टी शिकून घेता आल्या. तसेच तेथे असताना क्रांतिकारक चंद्रशेखर आजाद यांच्याशी संबंध आला. ते त्यांच्या संघटनेत स्वयंस्फूर्तीने सामील झाले लढाईचे अनेक मंत्र त्यांनी शिकून घेतले, आणि बंदूक कशी चालवायची याचे ज्ञान प्राप्त करून घेतले. आपली शिकार कशी ठेवावी हे त्यांनी अभ्यासाने आत्मसात केले.

इंग्रजांच्या गुलामगिरीत आपला देश सापडला आहे, हे त्यांनी ओळखले. भारतमातेला आपण मुक्त करायचा प्रयत्न केला. पाहिजे हे ओळखले. 30 ऑक्टोबर 1928 रोजी सायमन कमिशन लाहोरला होते. त्यावेळी लाला लजपत राय यांनी पुढाकार घेऊन एक मोठी मिरवणूक काढली होती. त्या मिरवणुकीवर इंग्रज सरकारच्या शिपायांनी जोरदार लाठीहल्ला केला होता. एक लाठी लाला लजपतराय यांना वर्मी लागली व त्यामुळे आजारी पडून लालजींचा अंत झाला होता. ही घटना पाहून सर्व क्रांतिकारक अतिशय संतापले होते. लाहोर येथे पोलिस ठाण्यातील दोन पोलीस अधिकारी या दुःखद घटनेस कारणीभूत होते.

राजगुरू यांना लालाजींचा अंत पाहून फारच दुःख झाले होते. चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंह यांच्या क्रांतिकारक संघटनेत राजगुरू सामील असल्यामुळे सर्वांनी एक कट रचला. राजगुरू बंदूक उत्तम तऱ्हेने चालवीत होते. ते पोलिस अधिकाऱ्यास बरोबर मारतील हे जाणून त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी दिली होती.

सर्वांनी मिळून योग्य प्रकारे नियोजन केले 17 डिसेंबर 1928 रोजी सँडर्स यांना बरोबर हेरली पहिल्या दोन गोळ्या बरोबर राजगुरू यांनी मारल्या आणि नंतर भगत सिंह यांनी मारल्या त्यांना पडावयास चननसिंग गेले. त्यावेळी चंद्रशेखर आजाद यांनी चननसिंग यांना बरोबर गोळी मारली. भारतीय क्रांतिकारकांनी जय जयकार केला.

आता येथे राहणे शक्य नाही. हे जाणून वेषांतर करून तेथून निघून गेले. अनेक गावोगावी वास्तव्य करून ते पुण्यात आले. नऊ महिन्यांचा काळ लोटला, पण इंग्रजांच्या ताब्यात राजगुरू सापडले नव्हते. परंतु 30 सप्टेंबर 1929 रोजी राजगुरूंना इंग्रज पोलिसांनी पकडले. त्यांना कैद करून तुरुंगात ठेवण्यात आले.

भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्यावर इंग्रजांनी खटला भरला. न्यायाधीशांनी त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. 23 मार्च 1931 रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा देण्यात आली. तिघेजण भारत मातेचा जयजयकार करत आनंदाने फाशी गेले. कोणतीही भीती त्यांच्या चेहर्‍वर नव्हती. आपल्या फाशीमुळे क्रांतीची बिजे पेरली जातील आणि देश लवकरच स्वतंत्र होईल याची त्यांना जाणीव होती. खेड या गावचे नाव राजगुरू यांच्या स्मरणार्थ राजगुरूनगर असे ठेवण्यात आले आहे.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

शहीद राजगुरू (महत्त्वाचे मुद्दे)

🔖 जन्म 24 ऑगस्ट 1908 खेड, पुणे येथे झाला.

🔖 पूर्ण नाव ~ शिवराम हरी राजगुरू.

🔖 कमी वयात वाराणशी येथे विद्याभ्यास करण्यासाठी व              संस्कृत शिकण्यासाठी गेले.

🔖 त्यांना व्यायामाचा छंद होता .अमरावती येथे हनुमान व्यायाम शाळेत त्यांनी मर्दानी खेळ प्रशिक्षण घेतले.

🔖 वाराणसी येथे शिक्षण घेताना अनेक क्रांतिकारकांच् सोबत त्यांचा संबंध आला. चंद्रशेखर आझाद यांच्या विचारांनी ते अधिक प्रभावित झाले, आणि ' हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी ' या संघटनेला जोडले गेले.

🔖 चंद्रशेखर आझाद यांच्या संघटनेत राजगुरूंना रघुनाथ या नावाने ओळखले जाई.

🔖 चंद्रशेखर आजाद, सरदार भगतसिंग, जतींद्रनाथ दास इत्यादी क्रांतिकारक राजगुरूंचे घनिष्ठ मित्र होते.

🔖 राजगुरू हे एक उत्तम निशानेबाज होते.

🔖 सँडर्स खुनसाठी राजगुरूंनी, भगतसिंग व सुखदेव यांना संपूर्ण साथ दिली.

🔖 पुढे त्यांना अटक झाली व सँडर्स खून खटल्यात 23 मार्च 1931 ला लाहोर सेंट्रल कारागृहात फाशी दिली गेली. अशाप्रकारे राजगुरू शहीद झाले.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


Friday, August 5, 2022

क्रांतिसिंह नाना पाटील

 क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील येडेमच्छिंद्र या खेडेगावात 3 ऑगस्ट 1900 रोजी झाला. त्यांच्या घरी गरिबी होती. वडील रामचंद्र गावचे पाटील होते. त्यांनी आपल्या गावात प्राथमिक शिक्षण पूर्ण केले त्या काळची मुलकी परीक्षा नानांनी उत्तीर्ण केली. ते थेट तलाठी म्हणून काम पाहू लागले. 

पुढे नाना पाटील हे सत्यशोधक समाजात सामील झाले. अनेक छोट्या-मोठ्या खेड्यात फिरून त्यांनी समाज रचना पाहिली. त्यावेळी लोक हुंड धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा वाढवू नका असे ते उपदेश करीत. वैज्ञानिक विचारसरणी शिवाय अंधश्रद्धा जाणार नाही, हे त्यांनी जाणले होते. अनेक प्रकारे ते लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करत होते. 

नानांच्या मनाला आणखीन एक गोष्ट सतत होती. ती म्हणजे अस्पृश्यता. सर्व माणसे प्रभूची लेकरे आहेत. तर मग हा छोटा, हा मोठा भेदभाव कशासाठी. एकमेकांना कमी मानल्यामुळे अडविले जाते आणि त्यामुळे समाजाची म्हणजे एका अर्थी राष्ट्राची प्रगती कमी होते. जीवन उत्तम प्रकारे जगण्याचा समान हक्क सर्वांना आहे. सर्वांनी प्रगती होऊ लागली तर त्यातच सर्वांचे कल्याण आहे. त्यांनी त्यावेळी समाजासाठी स्पृश्य-अस्पृश्य ही दरी कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे समाज जागृती झाली.

 त्यांच्या मनात महात्मा गांधीं बद्दल अत्यंत आदराची भावना होती; परंतु इंग्रज फक्त अहिंसेच्या मार्गाने ऐकणार नाहीत. असे नेत्यांना धडा शिकवला पाहिजे असे त्यांना वाटत होते त्यांनी 1942 सालच्या 'छोडो भारत' आंदोलनात भाग घेतला आणि सातारला प्रतिसरकार स्थापन केले ते पत्री सरकार या नावाने ओळखले जात असे ब्रिटिश सरकारने त्यांना पकडण्यासाठी दहा हजार रुपये इनाम लावला; परंतु नाना कोणाच्या हाती आले नाहीत.

 एकदा राज्य आपल्या हाती आले की प्रत्येक गावात लोकनियुक्त पंचान कडून त्या गावचा कारभार चालवायचा, न्यायदान करायचे अशी नानांची ग्राम राज्याची कल्पना होती. त्याप्रमाणे कराड , वाळवे तासगाव इत्यादी गावात पंच सभा व न्यायदान समित्या स्थापन केल्या. नानांच्या प्रतिसरकार मुळे गावातील अनेक व्यसनाधीन लोकांना आळा बसला. 

1946 ला भारताला स्वातंत्र्य देण्याचा विचार सुरू झाला व काँग्रेस मंत्रिमंडळ अधिकारावर आले. त्यामुळे नानांचे पकड वॉरंट रद्द करण्यात आले. नानांनी सांगितले की माझ्या सर्व भूमिगत यांचे पकड वॉरंट रद्द करणार असाल तर हजर राहील. मंत्रिमंडळाने ते मान्य केले. आपल्या ा सर्व सहकार्‍यांचे नाना कोरेगावला प्रकट झाले. पुढे ते दोन वेळेला लोकसभेवर निवडून गेले. भारतीय संस्कृती श्रेष्ठ मंडळाचे सदस्य म्हणून ते रशियाला जाऊन आले. गोरगरिबांना बद्दल त्यांच्या मनात अपार जिव्हाळा होता. क्रांतिकारी मार्गांनी इंग्रज शासनाला हादरवणारे महाराष्ट्रातील एक व्यक्तिमत्त्व म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील यांना ओळखले जाते. त्यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1976 साली झाला.