दिवाळी
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. भारतात सर्वच लहान थोर लोक तो साजरा करतात. या सणाच्या वेळेस दाराबाहेर पणत्या लावतात. तसेच आकाश कंदील टांतागत आणि सुंदर रांगोळ्या सुद्धा काढतात. कार्तिक महिन्यात येणाऱ्या ह्या सणाचे एकूण पाच दिवस मानले जातात. पहिल्या दिवशी असते वसुबारस, दुसऱ्या दिवशी असते धनत्रयोदशी, तर तिसऱ्या दिवशी असते नरक चतुर्दशी. चौथ्या दिवशी पाडवा आणि लक्ष्मीपूजन असते. तर पाचव्या दिवशी भाऊबीज असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापारी बंधू हिशोबाच्या चोपड्यांची पूजा करतात. भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळते.
दिवाळीत मुलांना शाळेला सुट्टी असते. नोकरदार लोकांना बोनस मिळतो. या सणाच्या निमित्ताने नवीन कपड्यांची खरेदी होते. घराला नवीन रंग दिला जातो. घराची साफसफाई केली जाते. गृहिणी चकल्या, लाडू, करंज्या, शंकरपाळ्या, चिवडा, शेव असे अनेक गोडाचे आणि तिखटाचे प्रकार करतात.
दिवाळीच्या वेळेस फटाके फोडले जातात. त्यामुळे हवा प्रदूषित आणि ध्वनी प्रदूषण होते. तसेच फटाक्यांच्या कारखान्यात लहान मुलांना कामाला लावले जाते. म्हणून फटाके बंद केले पाहिजेत.
असा हा दिवाळीचा सण मला खूप आवडतो.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
इतर निबंध वाचण्यासाठी खालील बटनाला तेच करा.
No comments:
Post a Comment