⚜️ महावीर जयंती ⚜️
सर्व दृष्टीने प्रसन्न असणारा चैत्र महिना जेव्हा येतो; हिंदू धर्मीयांच्या नववर्षाला प्रारंभ होतो. आनंदाप्रीत्यर्थ गुढी उभारून साजरा केला जाणरा सण 'गुढीपाडवा'.
गुढीपाडवा (वर्षप्रतिपदा' हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानला जातो. हा दिवस पुण्यकाळासारखा म्हणून नवीन कामाचा, कार्याचा शुभारंभ या दिनी केला जातो. या महिन्यात हवेतील गारवा कमी झालेला असतो. व उन्हाळ्याला प्रारंभ होतो. त्यामुळे सुरुवातीच्या या उन्हाळ्यााला तीव्रता नसते. या दिवशी पहाटे लवकर उठून मन व शरीर प्रसन्न करण्यासाठी प्रातर्विधी उरकून स्नान केले जाते. घरातील देवांच्या पूजेबरोबर, हा सण ज्या वारी आला आहे, त्या वाराच्या आधिपतीची पूजा केली जाते.
पूर्वी गुढी उभरण्यासाठी चांदीचा कलश व जरी वस्त्र वापरले जात. आजसुद्धा ही प्रथा आहे. आता वस्त्राच्या ऐवजी भगवा झेंडा काठीला बांधून, त्यावर गडू किंवा छोटा तांब्या उपडा ठेवून, त्यावर फुलांची भरगच्च माळ, साखरमाळ बांधतात. व गुढी तुळशी-वृंदावनाच्या बाजूला बांधली जाते. या दिवशी कडुलिंबांच्या कोवळ्या पानात, हरभऱ्याची डाळ, ओवा, मीठ, गूळ घालून हे मिश्रण वाटले जाते. नंतर घरातील सर्वांना हा प्रसाऱ्या जगाला प्रेम आणि शांति, अहिंसा आणि अपरिग्रह यांचा सनातन संदेश देणारे भगवान महावीर याच पवित्र भूमित जन्माला आले. जैनांत २४ तीर्थकार झाले. त्यांपैकी शेवटचे तीर्थकार वर्धमान महावीर होते. २३ वे तीर्थंकार पार्श्वनाथ यांनी चातुर्याम धर्म सांगितला होता. तो अस्तेय, अहिंसा, सत्य व अपरिग्रह या चार तत्त्वांवर आधारलेला होता. त्यात महावीरांनी ब्रह्मचर्याची भर घातली आणि तो पंचव्यामधर्म झाला. स्त्री-पुरुष समानतेच्या तत्त्वाचा प्रसार करून स्त्रियांनाही सन्यासाचा अधिकार दिला. त्या वेळच्या परिस्थिती नुसार महावीरांनी घेतलेला निर्णय फारच धाडसाचा होता. त्यांनी हिंसेला केलेल्या विरोधामुळे वैदिक धर्मात यज्ञयागातील हिंसा निषेधार्थ ठरवली गेली.
अशा या थोर धर्मवीराचा जन्म सनपूर्व सहाव्या शतकात मगधातील कुंडग्राम येथे झाला. महावीर बालपणापासूनच चिंतनशील होते. कालांतराने वैराग्यशील बनले. वासनांचा आणि मोहाचा त्याग करून, त्यांच्यावर विजय मिळवणारे ते जितेंद्रिय होते. त्यांचा छळही झाला परंतु त्यांनी तो न बोलता सहन केला. त्यांच्या विचारांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
जैन लोकांची शाकाहार, अहिंसा आदी तत्त्वे सवींनाच हितकारक आहेत. आजच्या समाजात जैन लोक शांतिप्रिय व परोपकारी घटक मनले जातात. आपणही महावीर जयंतिदिनी आपल्या मनातील, हिंसा, द्वेष, असूया यांचा त्याग करून त्यांच्या पवित्र चरणी विनम्र होऊया.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
इतर सणांची माहिती वाचायची असेल तर खालील बटनाला टच करा.
No comments:
Post a Comment