हुशार बिरबल
एकदा बिरबल आणि अकबर बादशहा बागेत फिरत होते. अकबर बादशहाला बिरबलाची गंमत करण्याची लहर आली. तो बिरबलाला म्हणाला, "तुला सगळेजण हुशार समजतात. तर मग सांग, आपल्या नगरात एकूण कावळे किती?
बिरबलाने ताबडतोब उत्तर दिले, 'नव्याण्णव हजार आठशे नव्याण्णव." बादशहाने आश्चर्याने विचारले, “ही संख्या बरोबर आहे ना? आपल्या नगरातील सगळे कावळे मोजले आणि ते कमी किंवा जास्त भरले तर?"
बिरबल म्हणाला, "कावळ्यांची संख्या जास्त भरली, तर शेजारच्या नगरातून पाहुणे कावळे आले असे समजावे. आणि संख्या कमी भरली, तर आपल्या नगरातील कावळे बाहेर गेले, असे समजावे "
बिरबलाच्या या हुशार उत्तरावर बादशहा खूश झाला.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
No comments:
Post a Comment