SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Monday, November 7, 2022

बादशाह व बिरबलाच्या चातुर्यकथा ~ हिम्मत सर्वश्रेष्ठ

⚜️ हिम्मत सर्वश्रेष्ठ ⚜️



                    अकबर बादशहाने मनाशी विचार केला की बिरबलाला कायमचाच आपल्या दरबारात ठेऊन घ्यावा. पण तशी नेमणूक करण्यापूर्वी त्याची परीक्षा घेण्यासाठी दरबार भरवला. अकबर बादशहाने सर्व प्रथम दरबारातल्या सर्व सरदारांना तीन प्रश्न विचारले की कुणाचा मुलगा सर्व श्रेष्ठ असतो ? कुणाचा दात सर्वश्रेष्ठ असतो व कुणाचा गुण सर्वश्रेष्ठ असतो ?

              यावर सर्व दरबारी मंडळींनी विचार केला व बादशहाला खुश करण्यासाठी सांगितले की बादशहाचाच मुलगा सर्वश्रेष्ठ असतो. राजहत्तीचा दात सर्व दातात श्रेष्ठ असतो व राजविद्या हाच सर्वश्रेष्ठ गुण आहे. ही उत्तरे ऐकल्यावर बादशहाने ओळखले की सर्व सरदार खरी उत्तरे सांगू शकत नाहीत व केवळ आपली स्तुती करण्यासाठी उत्तरे रचून सांगत आहेत. बादशहाने तेच तीन प्रश्न बिरबलाला विचारले तेव्हा थोडा वेळ विचार करून बिरबलाने सांगितले की गाईचा मुलगा बैल हा सर्वश्रेष्ठ मुलगा आहे. बिरबलाचे उत्तर ऐकताच सर्व दरबार खो-खो हसू लागला. 
                  अकबर बादशहाने बिरबलाला स्पष्टीकरण विचारल्यावर बिरबल उत्तरला, "जहाँपनाह! गाईच्या मुलामुळे शेते नांगरली जातात, त्यामुळेच आपणा सर्वांना अन्न धान्य मिळते म्हणून बैल हाच सर्वश्रेष्ठ मुलगा होय. '
                 दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर, म्हणजे नांगराचा दात सर्वात श्रेष्ठ दात होय कारण तो नसेल तर शेत नांगरताच येणार नाही व धान्यही पिकणार नाही. 
                  तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे हिम्मत हाच गुण सर्वश्रेष्ठ आहे. तलवार चालविण्याची विद्या माहित असली तरी तलवार चालविण्याची हिम्मत नसेल तर त्या विद्येचा काही उपयोग होत नाही म्हणून हिम्मत हाच गुण सर्वश्रेष्ठ आहे.
                  बिरबलाची उत्तरे ऐकून साऱ्या दरबाराने टाळ्यांचा कडकडाट केला व त्याच्या बुध्दिमतेची प्रशंसा केली. यामुळे बादशहाने बिरबलावर खुश होऊन त्याची आपल्या दरबारात नेमणूक केली.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
तुम्हाला जर इतर अकबर बिरबलाच्या चातुर्य कथा वाचायच्या असतील तर खालील बटनाला टच करा.


🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
Whatsapp group मध्ये सामील होण्यासाठी खाली टच करा.


No comments:

Post a Comment